Homeताज्या बातम्याउरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते जलमय, आठ तासाहून...

उरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते जलमय, आठ तासाहून अधिक महामार्गावरील वाहतूक ठप्पच 

उरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते झाले जलमय, आठ तासाहून अधिक महामार्गावरील वाहतूक ठप्पच 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : शनिवारी मध्यरात्रीपासून चालु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गासह उरुळी कांचन परिसरातील अनेक ठिकाण अक्षरशः जलमय झाले आहेत. तसेच उरुळी कांचन भवरापूर रस्तावरील दत्तवाडी परिसर पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दत्तवाडी येथे दरवर्षी हीच परिस्थिती होत आहे.

 “दरवर्षी पावसात पाणी साठण्याचे ठिकाणे- 

(पुणे सोलापूर महामार्गावरील ठिकाणे इरिगेशन कॉलनी, हरणा कॉम्प्लेक्स, प्रिता टायर, देवकर पेट्रोल पंप, या ठिकाणांचा परिसर दरवर्षी पाण्याखाली येतो, तसेच दत्तवाडी परिसर रस्तावर दोन ते तीन फुट पाणी, संबंधित प्रशासनाला जागं कधी येणार ?)

महामार्गावरील इरिकेशन कॉलनी परिससरात पाणी जाण्यासाठी गटर लाईन नसल्याने पाणी इरिकेशन कॉलनीतील रस्त्याच्या परिसरात एक ते दीड फूट जमा होते. दोन तीन हजार लोकांना त्या पाण्यातुन पायी प्रवास करावा लागतो. तसेच उरुळी कांचन भवरापूर रस्त्यावरील दत्तवाडी या ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी साचते त्यामुळे दरवर्षी हीच परिस्थिती पाहायला मिळते.

महामार्गाच्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी पाण्याचा महापूर ओसंडून वाहत असल्याने महामार्गावर शेकडो वाहने अडकली असून काही गाड्या पाण्यात बंद पडल्या आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिल्याने पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवासी तासन्‌तास गाड्यांमध्ये अडकले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उरुळी कांचन पासून एकूण दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.

पावसामुळे महामार्गावरील नीचांकी भाग जलमय झाल्याने वाहनांना पुढे जाणे अशक्य झाले. काही वाहनचालकांना रात्रभर महामार्गावरच थांबावे लागले तर काही प्रवाशांनी रस्त्यालगतच्या हॉटेल्स व पेट्रोल पंपांवर आश्रय घेतला. यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होत असून, पावसाचे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाने अनेकदा आश्वासनं दिली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष! ✍️ नितीन करडे यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल...

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वैष्णव...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष! ✍️ नितीन करडे यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल...

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वैष्णव...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...
error: Content is protected !!