उरुळी कांचन येथे पुन्हा नवीन चौकात दोन अपघात ; दोन जण जखमी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वाहनांना नवीन चौकाचा अंदाज येत नसल्याने आज पहाटे पुन्हा दोन तासात दोन अपघात झाले असुन यात दोन जण जखमी झाले आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन चौक करण्यात आले यात होणाऱ्या ‘ वाहतुक कोंडीतुन नागरिक सुटले, पण अपघातात सापडले ‘ नवीन चौकात सतत अपघात पाहायला मिळत असल्याने नागरिक बोलत आहेत.
” उरुळी कांचन येथील नवीन चौकात उपाययोजना अभावी अनेक अपघात, उपाय योजनेसाठी संबंधित प्रशासन नागरिकांचा बळी जाण्याची वाट पाहतय का ? वाहन चालकांसह नागरिकांचा सवाल”
मिळालेल्या माहितीनुसार (ता. 26) मंगळवार रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालयाच्या समोरील नवीन चौकात एक वळण घेत असलेल्या आयशर टेम्पो ला पाठीमागून हायवा ट्रकने जोरदार धडक दिली यात दहा टायर डंपर हायवा ट्रक मधील पवन सिंग वय 32 रा. उत्तर प्रदेश व अन्वर शहा उत्तर प्रदेश हे दोघे जखमी झाले आहेत. त्याच चौकात सात वाजण्याच्या दरम्यान टाटा कंपनीचा 407 टेम्पो पुण्याच्या दिशेने वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात टेम्पो रस्त्यावरून कस्तुरी कार्यालयाच्या आवारात घुसला, त्यावेळी सुदैवाने महामार्गवरुन कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला.
{अपघात ग्रस्त वाहन भर रस्त्यात उभे असल्याने पुन्हा अपघातास निमंत्रण-
गाव असुन दिशा फलक आणि वाहनांची गती कमी करणाऱ्या उपाययोजना अध्याप नाही. नवीन चौकातुन वाहनांना वळण घेताना व जाताना अंदाज येत नसल्याने सतत अपघाताची मालिका सुरुच आहे. महामार्गावरून वाहने बेभान चालतात, या चौकात रंम्बलर, हायमास दिवे, दिशादर्शक फलक, फ्लेशर ( लुक लुक दिवे) चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने नवीन चौकात सतत अपघात होत आहेत, उपाय योजनेसाठी संबंधित प्रशासन याठिकाणी नागरिकांचे बळी जाण्याची प्रतीक्षा करतय का ?
–अलंकार कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य.
सकाळी साडे सहाच्या दरम्यान ट्रक पास करुन समोरून टेम्पोने अचानक वळण घेतले , टेम्पोने इंडिकेटर (फ्लेशर) लावला नव्हता , वळण्यासाठी टेम्पो अचानक आडवा येऊन थांबल्याने अपघात झाला
– इनुस अन्सारी , ट्रक चालक.
























