✍️नितीन करडे
उरुळी कांचन येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे तुळशीराम नगर येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत (ता. २७) शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी देहू आळंदीहून पंढरीला जाणारी वारी हि अवघ्या महाराष्ट्राचे भूषण असुन लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी वारी करत जात असतात. अशाच प्रकारचा उपक्रम चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत राबविण्यात आला. याप्रसंगी मुलांनी वेगवेगळे वारकऱ्यांच्या वेशभूषा केले होते. यात विठोबा रखुमाई ची मूर्ती घेत वारकरी तसेच पालखी घेऊन दिंडी काढण्यात आली.
या दिंडीमध्ये नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देण्यात आला. त्यामध्ये ” झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, निर्मल वारी “ यासारखे संदेश देण्यात आले. तसेच भजन, अभंग म्हणत पालखी सोहळा उरुळी कांचन येथील श्री राम मंदिर पोहचून सांगता करण्यात आला. याप्रसंगी चाणक्य किड्स अकॅडमीच्या संस्थापिका पल्लवी ताम्हाणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.























