✍️नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत उपसरपंचपदी सायली जितेंद्र बडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच स्वप्निशा कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सायली बडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानंतर बडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवार (ता. ८ सप्टेंबर) रोजी सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. तर ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. यावेळी अजिंक्य कांचन, संतोष कांचन, सीमा कांचन, हेमलता बडेकर, राजेंद्र टिळेकर, जितेंद्र बडेकर, मयूर कांचन, दत्तात्रेय कांचन, मिलिंद जगताप, भाऊसाहेब कांचन, अनिता बगाडे, अनिता तुपे, संचिता कांचन आदी ग्रा. सदस्य उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सायली बडेकर म्हणाल्या कि, गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान अंतर्गत दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करेल. व गाव स्वच्छतेवर भर ठेवण्यात येईल तसेच रस्ते आणि पाणीपुरवठा इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असेल. सर्वसामान्यांपर्यंत कल्याणकारी योजना राबवेल.
“पंचक्रोशीत ओळख असणारे बडेकर कुटुंबीय हे नेहमी राजकारणात सक्रिय-
विद्यमान उपसरपंच सायली बडेकर यांचे सासरे दिवंगत नेते आंबेडकर चळवळीचे नेते तर सासूबाई हेमलता बडेकर या पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि पती माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर
……























