शनिवारी सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर आंदोलकांनी तीन राज्यमंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानावर हल्ला केला, त्यानंतर सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. तसेच राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण इंफाळ खोऱ्यात वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याचे मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानात घुसलेल्या आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने शनिवारी संध्याकाळी सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
मणिपूर सरकारने केंद्राला AFSPA हटवण्याची विनंती केली

मणिपूर सरकारने केंद्राला राज्याच्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या भागात सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (AFSPA) पुनरावलोकन करून काढून टाकण्याची विनंती केली. केंद्राने हिंसाचारग्रस्त जिरीबामसह मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पुन्हा AFSPA लागू केला आहे. आंदोलकांनी AFSPA पुन्हा मनमानी पद्धतीने लागू केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
- मणिपूरमध्ये वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या जातीय संघर्षामुळे राज्यातील तणावाचे वातावरण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
- गेल्या वर्षी मे महिन्यापासून मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
- या हिंसाचारात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
- जिरीबाम जिल्ह्याची सीमा मिझोरामशी आहे.
- मिझोराम सरकारही शेजारच्या राज्यात काय घडत आहे यावर लक्ष ठेवून आहे.
- अलीकडील घटनांबाबत, मिझोरम सरकारने लोकांना राज्यातील जातीय हिंसाचार टाळण्यासाठी ‘अत्यंत सावधगिरी’ बाळगण्याचे आवाहन केले.
मणिपूरच्या लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला
मिझोरमच्या गृह विभागाच्या म्हणण्यानुसार, मणिपूरमधील 7,700 हून अधिक लोक सध्या राज्याच्या विविध भागात आश्रय घेत आहेत. मिझोरमच्या गृह विभागाने एक निवेदन जारी करून आश्वासन दिले की राज्य सरकार सर्व बाहेरील लोकांच्या, विशेषत: मणिपूरच्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पावले उचलत राहील. मिझोरामच्या बाहेर, विशेषतः मणिपूरमध्ये राहणारे मिझो नागरिक, विद्यार्थी आणि स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेसाठी सरकार पावले उचलेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल राज्य सरकारने दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल आणि हिंसाचारात जखमी झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला.























