✍️ नितीन करडे
सुदैवाने कोणास काही दुखापत नाही
उरुळी कांचन (ता. हवेली) एम जी रोड येथील ग्रामपंचायतीचे १८ गाळे आहेत. हे गाळे भाड्याने दिले असुन या १८ गाळ्यामधील तीन दुकानांच्या गाळ्या वरील पंचवीस ते तीस फुट भिंत (पडवी) पञ्यावर पडली असल्याची घटना गुरुवार (दि.२० फेब्रुवारी रोजी ) १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या समोरच पञा असल्याने भिंत पञ्यावर पडली. ग्रामपंचायतच्या गाळ्यात शालेय वस्तूंचे दुकाने असुन शाळेच्या जवळ असल्याने या ठिकाणी विद्यार्थी खरेदी साठी येतात. सुदैवाने कोणास काही दुखापत झाली नाही. तसेच ग्रामपंचायत गाळ्यांच्या बांधकामाला वीस वर्षाच्या आसपास झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच उर्वरित गाळ्यांवरील पडवीच्या भिंतीला भेगा पडल्या असुन पुढे अपघात नाकारता येत आहेत.
ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांवरील पडलेल्या भेगा, उरुळी कांचन ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
























