नितीन करडे
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे महाबोधी बुद्ध विहार व संविधान ग्रुपच्या वतीने २०२५ आयोजित संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव निमित्त उरुळी कांचन येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात बडेकर नगर पासुन महात्मा गांधी रोड, सोलापूर रोड मार्गे तळवाडी, आश्रम रोड ते बाजारपेठ ते बडेकर नगर अशी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी संविधानाची प्रत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, गौतम बुद्धांची मूर्ती आणि तसेच सर्व महापुरांची प्रतिमा घेऊन सर्व जाती धर्मांना शांततेत व एकतेचा संदेश देणारी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक महाबोधी बुद्ध विहार व संविधान ग्रुप आणि सर्व बहुजन समाज आदी उपस्थित होते. उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या सुचनेनुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. उरुळी कांचन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी तसेच आदी ग्रामस्थ महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.























