राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपाचे वाटप व प्रेरणादायी व्याख्यानाने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था मर्या.चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र (बापू) ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी रॉयल बँक्केट हॉल, पुणे–सोलापूर रोड, उरुळी कांचन येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राजेंद्र (बापू) कांचन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थितांना वृक्षरोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी जपण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे “आता थांबायचं नाय…!” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान. त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असा मोलाचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. उपस्थितांनी राजेंद्र (बापू) कांचन यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

























