पुणे सोलापूर महामार्गावर अवजड वाहने सुसाट ; धोकादायक वाहतूक वाहनांवर कारवाई कधी ?
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर अवजड वाहने सुसाट वेगाने धावत असुन त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अशा वाहनांवर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
बेधुंद सुसाट हायवामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले अनेक उदाहरणे ताजे असतानाच बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील इनामदार वस्ती ते थेऊर फाटा दरम्यान दहा टायर हायवा ट्रकला समोर व मागील बाजूस नंबर नसलेला बेफिकीर सुसाट धावत होता. अनेक वाहणांना तो साईट देत नसल्याचे वाहन चालकांनी सांगितले. अशा बेफिकीर सुसाट वाहणावर कारवाई कधी होणार तसेच विना नंबरची वाहने महामार्गावर धावतातच कशी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक हायवावर पुढे-मागे नंबर प्लेटही नसल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होत आहे. या धोकादायक वाहतुकीकडे प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. हायवाच्या बॉडीच्या वर मोठे दगड बाहेर लोंबकळत असल्याने कधीही हे दगड रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीट, माती, मुरूम वाहतूक करणारे वाहने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कुठलीही उपाय योजना राबवत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
पुणे सोलापूर महामार्गावर अवजड सुसाट धावत असलेला वाहन –
प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या अवजड चालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणले नाही तर कोणत्याही क्षणी मोठी घटना घडू शकते, अशी भीती वाहनचालकांसह नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच कारवाई कधी होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर विना नंबरचे अवजड वाहनांची दौड , अनेक अवजड वाहने सुसाट, वाहतूक पोलीसांची कारवाई मात्र सर्वसामान्य नागरिकांवरच का ? , पुणे सोलापूर महामार्गासह शिंदवणे ते उरुळी कांचन मार्गावर अवजड वाहतूक होते, धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी ?























