ऐन दहावीच्या परीक्षेत उरुळी कांचनमध्ये टुकारांचा हैदोस; परीक्षेला आलेले विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ?
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना उरुळी कांचन येथील शाळा परिसरात तोडाला रुमाल, मास्क बांधुन टुकार मुलांचा उच्छाद शिगेला पोहोचला आहे. शाळेशी कोणताही संबंध नसलेली काही मुले दररोज गेटसमोर मोटारसायकलींवरून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत, सायलेंसरचा कर्कश आवाज करत आणि वारंवार फेऱ्या मारत धुडगूस घालत आहेत. यामुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे. बुधवार (ता. १८ मार्च) रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या महत्त्वाच्या वेळेत ही टोळकी जाणीवपूर्वक परिसरात फिरत होती. पेपर सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरूच असतो. शांतता आवश्यक असताना निर्माण होणारा हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर थेट परिणाम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
” गाड्यांचा मोठा आवाज , विनाकारण हॉर्न मारत शाळेबाहेर टुकारांची दादागिरी, “विद्यार्थी अभ्यासात, टुकार उच्छादात!, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर?
विशेष म्हणजे, परीक्षा दरम्यान एम. जी. रोड, बायफ रोड परिसरातही या टुकारांनी अक्षरशः रस्त्याला रेसिंग ट्रॅक बनवले असून, ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज शेवटचा पेपर असल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांवर मानसिक अत्याचार; टुकारांच्या गोंधळाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीचे भविष्य धोक्यात?
पालकांचा संताप उफाळला असून, “विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा,” अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र, अद्याप पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून या टुकारांना आवर घालणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागू शकते असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
” पुर्वी शहर पोलिसांची चौकी असताना चार पोलीस अख्खी उरुळी कांचन व परिसरातील गावात पोलिसांची दहशत होती, आता ग्रामीणचे पोलीस स्टेशन असुन यात साठ पोलीस असतानाही साधे पोलीस स्टेशन असलेले उरुळी कांचनच्या शाळेच्या परिसरात पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे वारंवार दिसून येते. शहर चे चार पोलीसच बरे नागरिकांमध्ये चर्चा “
























