उरुळी कांचन गावातून वाहणारा ओढा कि ढम्पिंग ग्राउंड ?..बाजार तळाच्या परिसरात कचऱ्याचे, व घाणीचे साम्राज्य, रोगराईला निमंत्रण.?
✍️नितीन करडे
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणून उरुळी कांचन बाजार पेठे ओळखली जाते. येथील आठवडे बाजार रविवारी असतो. या बाजारात बाजार घेण्यासाठी वीस ते पंचवीस गावातील व चाळीस वाड्यावस्तीतील नागरिक येतात. याच बाजार मैदानात अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असुन त्या घाणीत जणावरे (वराह) दिवसभर लोळतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच उरुळी कांचन येथील ओढ्यात अनेक दिवसापासून कचरा,प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच जमा झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
” परिसरात ताप, सर्दी खोकला,घसा दुखण्याच्या रुग्णात वाढ “
कचऱ्याचे व घाणीचे ठिकाण:-
” पुना सायरस शाळेच्या समोरील ओढ्यात अनेक ठिकाणी कचरा व घाण , जिजाऊ सभागृहाच्या शेजारी ओढ्यात कचरा, डाळिंब चौक ओढ्यात अनेक दिवसापासून साचलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा कचरा, दत्तवडी रोड लगत कचरा, नवीन ग्रामपंचायत बिल्डिंग समोर व तळवाडी येथील ओढ्यात माशांची व चिकन चे वेस्टेजची घाण, त्यामुळे परिसरात दुर्गंधी, ये-जा करणाऱ्या नागरिकांची दमछाक “
“बाजार मैदानातील दोन ठिकाणीचे शौचालय आहेत पण तेथे स्वच्छताचा अभाव, परिणाम सायरस शाळेच्या परिसरात नागरिक उघड्यावर शौचास बसतात, समोरच ओढ्यातुन दुर्गंधीचा पसार, त्यामुळे शाळेतील मुलांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? “
सध्या ताप,सर्दी, खोकला, घशाचे रुग्ण आहे त्यात सर्वाधिक तापेचे रुग्ण जास्त आहेत. नागरिकांनी पाणी साठा करणे टाळावा कारण पाणी साठ्यामुळे डेंग्यू चा प्रासार होऊ शकतो, पिण्याचे पाणी झाकुन ठेवावे ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, ठंडी, अशा स्वरूपाचे लक्षणे आढतात, यामधील काही जाणवल्यास नागरिकांनी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. समीर ननावरे, गणराज हॉस्पिटल उरुळी कांचन.
वराहाच्या वावरामुळे परिसर दूषित होत आहे, उरुळी कांचन परिसरात कचरा टाकणारे जास्त नौकरदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली कि पुन्हा कोणी ही कचरा टाकला जाणार नाही. परिसर घाण करणाऱ्या वर कारवाई होणे गरजेचे आहे. तो मग कोणी का असेना.
-मयुर कांचन- मा. सरपंच उरुळी कांचन.
मी आताच काही दिवसापूर्वी सरपंच झाले. ओढा लवकरात लवकर साफ करणार आहे. कचरा टाकणाऱ्या ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहोत.आमचा स्वच्छतेवर जास्त भर आहे. बाजार मैदानातील कचरा सोमवारी उचला जातो.
-ऋतुजा कांचन, सरपंच, उरुळी कांचन.


























