उरुळी कांचन-सोडतापवाडी गणात जिल्हा परिषद निवडणूकी साठी नवा चेहरा चर्चेत ; अनिल कदम यांच्या सायकल दौऱ्याची नागरिकामधे चर्चा
✍️नितीन करडे
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून उरुळी कांचन सोडतापवाडी गणात नवा चेहरा म्हणून उदयास आलेले इच्छुक उमेदवार अनिल कदम मोठ्या चर्चेत आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून घराघरांत सायकल वरून प्रवास करत मतदारांशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला असून या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
इच्छुक उमेदवार अनिल कदम यांची सायकल वरून मतदारापर्यंत संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम चर्चेत
वार्डातील अनेक भागांमध्ये कदम यांचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आले.तसेच इच्छुक उमेदवार अनिल कदम यांची पारंपरिक पद्धतीने ववाळणी करून स्वागत केले. प्रचारादरम्यान मिळालेल्या या प्रेमळ प्रतिसादामुळे अनिल कदम भावुक झाले.
नागरिकांच्या विश्वासाबद्दल बोलताना अनिल कदम यांनी सांगितले, “मला जनतेची सेवा करायची आहे. जनतेने संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन.”
सायकल दौऱ्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचत, संवाद साधत व मतदारांचा विश्वास जिंकत असल्याने उरुळी कांचन-सोडतापवाडी गणात नव्या उमेदवाराची जोरदार चर्चा रंगत आहे.





















