✍️नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे सकाळ पासून प्रचंड वाहतुक कोंडी ; प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहने निघाली विरुद्ध दिशेने; पोलिसही वाहतूक कोंडी सोडवण्यात हतबल…
उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे आज सकाळ साडे आठ ते ९ वाजण्याच्या दरम्यान तळवाडी चौक जाम झाला होता. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या त्यावेळी तळवाडी चौकात पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी झाली, त्याचा परिनाम दोन्ही महामार्गाचे रस्ते जाम झाले. त्यात ‘विरुध्द दिशेने निघाली वाहने’ दोन्ही रस्ते जाम झाले व नंतर पोलीस आले पण तो पर्यंत झालेली वाहतूक कोंडी हाताबाहेर गेली होती. त्याचा परिणाम १ वाजले तरी झालेली वाहतूक कोंडी सुरुळीत झाली नाही. सकाळपासुन हायवे जाम असल्याने, वाहने बाजारपेठेच्या रस्त्याने आली, त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली, त्याचा फटका दुकानदारांना सहन करावा लागत आहे. असे दुकानदार यांनी सांगितले.
महामार्गावर वाहतुकीचा लोड आल्याने जड वाहतूक सह अन्य वाहने उरुळी कांचन गावातील अंतर्गत रस्त्यावरून (एम जी रोड, साखरे पेट्रोल पंप) मार्ग काढत निघाली त्यामुळे गावातील रस्ते ही जाम झाले. महामार्गावरून पोलिसांच्या समोरूनच विरुद्ध दिशेने निघाली वाहने..
या वाहतूक कोंडीत ॲम्बुलन्स,सिटी बसेस, स्कूल बसेस, वाहतूक कोंडीत अडकून पडले, तसेच दररोजच्या कामगार वर्गाला व शाळकरी मुलांनाही याचा फटका बसला,
-
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात लोक प्रतिनिधी खासदार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
” पुणे सोलापूर वाहतूक कोंडी संदर्भात अधिवेशन मध्ये मी दोन वेळा मुद्दा मांडला असुन अजुन मांडत आहे. आपण डिव्हिजन वेगळं घेत आहोत, लवकरच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, मी स्वतः संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे. आपल्याला जनतेची कामे करायची आहे.”
-ज्ञानेश्वर (माऊली) कटके – शिरूर हवेली आमदार,




















