नितीन करडे
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे : वाघोलीतील न्याती एलाना सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर काही युवकांकडून थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस लावण्यात आली. नागरिकांनी विरोध केला व जाब विचारला म्हणून जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकांकडुन शिवीगाळ व दमदाटी करत धमकी देण्यात आली असुन तुम्हाला आम्ही सोडणार नाही अशी ही धमकी देण्यात आली. असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीवर चांगलाच वायरल झाला आहे.
या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्मार्ट सिटी हीच आहे का? स्मार्ट सिट असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला आहे. अशा मुजोर गुंडशाही व दहशत निर्माण करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस काय? कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























