आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांना १९१ व्या पुण्यतिथीनिमित्त उरुळी कांचनकडून विनम्र अभिवादन
✍️नितीन करडे
उरुळी कांचन | प्रतिनिधी : आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या १९१ व्या पुण्यतिथी निमित्त उरुळी कांचन येथे त्यांच्या कार्याला व बलिदानाला स्मरण करत उरुळी कांचन ग्रामसचिवालय येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्यलढ्यातील पहिले क्रांतीकारक म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांनी उभारलेला लढा आणि जनतेसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त उरुळी कांचन परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “राजे उमाजी नाईक यांचे शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उरुळी कांचन चे ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, उरुळी कांचन गावचे सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, ऋतुजा कांचन, मयूर कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, तसेच अजित जाधव, मोनिका चव्हाण, आदी ग्रामपंचायत सदस्य, पधादिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.























