नितीन करडे
गरजुवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ; शिकेल तोच टिकेल -निखिल कांचन
नुकत्याच शाळा चालू झाल्या असुन गरजू, होतकरू काही विद्यार्थ्यांना अजुन पुस्तके वह्या मिळाली नसल्याचे व गरीब परिस्थिती असल्याने पालकांना भार झेपत नसल्याचे गांभीर्य लक्षात घेता. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा एक हात पुढे म्हणून उरुळी कांचन येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी निखिल भैय्या कांचन मित्रपरिवार मार्फत शनिवार (ता. २१ जून रोजी) गरजू विद्यार्थ्यांना वह्या़चे वाटप करण्यात आले. यामधे पहिली ते सातवी च्या सर्वच विद्यार्थ्यांना एकुण १५०० वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना निखिल कांचन यांनी सांगितले कि जीवनात पुढे जायचे असेल तर शिक्षण खुप महत्वाचे आहे. त्याकरिता प्रत्येकाने मन गंतवुन अभ्यास करा. असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच अजून कोणी गरजु विद्यार्थी असेल तर सांगा त्यांनाही लागेल ती मदत देऊ असे निखिल भैय्या कांचन यांनी सांगितले. आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.
यावेळी बोलताना डॉ रवींद्र भोळे यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ शैक्षणिक मदत न करता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाट उजळ करणारा ठरेल, असा ठाम विश्वास आहे. शिक्षणासाठीची ही बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे.
यावेळी सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक कुंजीर, डॉ भोळे ,अमोल मेहेर , शरीफ सय्यद, अविनाश टकले, निखिल (भैय्या) कांचन मित्रपरिवार तसेच आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.























